Wednesday 5 April 2017

जय मल्हार मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप...

             "येळकोट येळकोट जय मल्हार" हा आवाज २ वर्षे झाले दर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता महाराष्ट्राच्या घराघरांतून ऐकू येतो. महाराष्ट्राच्या या कुलदैवताबद्दल बरीच माहिती ह्या मालिकेने प्रेक्षकांना मिळवून दिली. झी मराठीवरील हि मालिका खूप गाजली. हि मालिका १८ मे २०१४ ला सुरु झाली आणि ह्या मालिकेने बघता बघता ९०० एपिसोड पूर्ण केले. ह्या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकांना खर आणि जवळच वाटू लागलं. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी म्हणजे हि मालिका लवकरच संपुष्टात येत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हि मालिका बंद करण्याचा निर्णय ह्या मालिकेने घेतला आहे.


                    दिग्दर्शक महेश कोठारे देवदत्त नागे,सुरभी हांडे,इशा केसकर हि आणि अशी ह्या मालिकेतील निगडित बरीच मंडळी प्रेक्षकांच्या नंतरही लक्षात राहतील. ह्या मालिकेचं शेवटचं शूटिंग १५ एप्रिल ला होणार आहे. तोपर्यंत हि मालिका एन्जॉय करा आणि बघत राहा सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता जय मल्हार फक्त झी मराठीवर.





majja.ooo : Ankita Lokhande. 

No comments:

Post a Comment